शिक्षण हा परिवर्तनाचा एकच उपाय आहे



शिक्षण हा परिवर्तनाचा एकच उपाय आहे.

आपल्या मुलांना शाळा शिकवा.

धर्मवीर आनंद दिघे साहेब ऑटो रिक्षा योजना


धर्मवीर आनंद दिघे साहेब ऑटो रिक्षा योजना समाज प्रत्येक ऑटो रिक्षा  यांच्यासाठी जनहितार्थ प्रसारित 
[तारीख १८/८/२०२५]



 

मातंग समाज स्मशान भूमी [ 15 ऑगस्ट 2025 रोजी ग्राम]



 स्मशानभूमी लढा

 (15 ऑगस्ट 2025 रोजी ग्राम सभेत हा विषय प्रत्येक गावाने 

लिखित स्वरूपात देण्यात यावा.)*


                         दिनांक 15 /8/25                                             ग्रामसभा


प्रति,

सरपंच साहेब

ग्रामसेवक साहेब,

ग्रामपंचायत कार्यालय

पूर्ण पत्ता........

गाव...........

ता...........

जिल्हा............


विषय - मातंग समाज स्मशान भूमी आरक्षित करून प्राथमिक सुविधा पुरविण्याबाबत.

महोदय,

वरील विषयी आम्ही गावातील रहिवाशी आज दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित ग्राम सभेत प्रस्ताव सादर करीत आहोत की मातंग समाजा साठी असलेल्या स्मशान  भूमीत अत्यावश्यक सेवा पुरविण्यात याव्यात.

तसेच सार्वजनिक स्मशान भूमी आरक्षित करून द्यावी.

तसेच अतिक्रमण रोखण्यासाठी  स्वतंत्र कुंपण घालून देण्यात यावे.

आपले विश्वासू,

समस्त

मातंग समाज बंधू भगिनी

सही

1

2

3

4

5

प्रत

पंचायत समिती कार्यालय.

जिल्हा परिषद अधिकारी

तहसीलदार

जिल्हा अधिकारी

मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

महसूलमंत्री महाराष्ट्र राज्य

समाजकल्याण मंत्री महाराष्ट्र


टीप - सदर पत्र ग्रामपंचायत कार्यालयास देऊन त्याची पोच घ्यावी.

तसेच  पोच अर्जाची सत्यप्रत 

संबंधित कार्यालयास पोस्टाने (रजिस्टर AD करून ) पुरावा जवळ ठेवावा

धर्मवीर आनंद दिघे ऑटो कल्याणकारी मंडळ योजनेचा फायदा घ्या.


 


जय लहुजी

आपण रिक्षा चालक / मालक आहात  का ? 

तर धर्मवीर आनंद दिघे ऑटो कल्याणकारी मंडळ योजनेचा फायदा घ्या.

खालील लिंक वर जाऊन माहिती भरा

आणि विविध योजनाचा फायदा घ्या. https://ananddighekalyankarimandal.org/home/register

धन्यवाद.

शिक्षित समाज सदृढ समाज

मातंग समाज संघ महा.राज्य


साहित्य रत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे १०५ व्या जयंती सुमन नगर चेंबूर मुंबई









 दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी साहित्य रत्न  लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे १०५ व्या जयंती सुमन नगर चेंबूर मुंबई येथे शैक्षणीक मार्गदर्शन करण्यात आले.

शिक्षित समाज सदृढ समाज घडवण्यासाठी शिक्षणाचा जागर हा उपक्रम सुरू करत आहोत.

मातंग समाज संघ महा.राज्य



साहित्य रत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे यांनी लिहलेला प्रसिद्ध महाराष्ट्र पोवाडा सचित्र ए आय चित्रफीत











 जय लहूजी

 घराघरात साहित्य रत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे हे घरोघरी पोचले पाहिजेत या साठी साहित्य रत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे यांनी लिहलेला  प्रसिद्ध महाराष्ट्र पोवाडा  सचित्र  ए आय चित्रफीत 

साहित्य रत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे सचित्र ए आय चित्रफीत







                                    जय लहूजी 

 साहित्य रत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे सचित्र  ए आय चित्रफीत 

 

!!लहू वंदना !!






!! लहू वंदना  !!


जय लहुजी 

आद्य क्रांतिवीर लहुजी साळवे यांची वंदना मुळे  देशाभिमान आणि चैतन्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही 

शाहीर बापू पवार यांनी लिहलेले आणि आपल्या मधुर आवाजात हे वंदन गीत घराघरात पोहचले पाहीजे 

 

शैक्षणिक मार्गदर्शन सुमन नगर चेंबूर मुंबई 2025


दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी साहित्य रत्न लोकशाहीर डॉ अण्णा भाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती निमित्त सुमन नगर चेंबूर मुंबई येथे शैक्षणीक मार्गदर्शन करण्यात आले.
शिक्षित समाज सदृढ समाज घडविण्यासाठी शिक्षणाचा जागर हा उपक्रम राबवित आहोत.
मातंग समाज संघ महा.राज्य



 शिक्षणाचा जागर या उपक्रमाच्या अंतर्गत आज दिनांक 6 जुलै 20250 रोजी मातंग समाज संघ महाराष्ट्र राज्य, छत्रपती संभाजीनगरवतीने व संस्थापक अध्यक्ष मा. विक्रमी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने कृष्णापूर येथे दहावी उत्तीर्ण प्रशिक्षण दिले व प्रोत्साहन व त्यांचे कौतुक म्हणून त्यांना पाच रेजिंग व पेन भेट दिली व त्यांचे अभिनंदन केले. पालकांनी मत केले.समाजामध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी मात समाज संघ, पोलीस संभाजीनगर येथील शेतकरी सदैव प्रयत्न करत आहेत. मदतीशिवाय हे काम करणे शक्य नाही. मा.पवार साहेब व दाभाडे साहेबांना सुटी नसले ते उपस्थित विराजमान शकले. त्यांनी खंत व्यक्त केली.आज कार्यक्रम सर्व दहावी उत्तीर्ण रज भालेराव, आदित्य साठे, पल्लवी भालेराव, रिया कांबळे, ववरी लोखंडे यांना प्रोत्साहन दिले. श्री.नामदेव कांबळे, सुशील कांबळे, आप्पाराव साठे, रूपक भालेराव, वैभव निकाजे तसेच महिला उपस्थित. सर्व विद्यार्थी पोलिस पालक मोल मजूळांना ज्ञानात.🙏जय लहुजी

 🇨🇮 अहिल्या नगर ता राहता नीमगांव जाळी येथील सुपुत्र यशवंत पवार सूभेदार स्थल सैन्यातुन २८ वर्ष सेवा हि कारगिल ते राजस्थान बॉर्डर पर्यंत सेवा करुन ,सेवानिवृत्त झाले होते.

आज दिनांक 6 जुलै 2025 रोजी मुंबई मध्ये मातंग समाज संघ महा.राज्य मुख्य कार्यालयात त्यांचा आदरणीय ॲड.विक्रम गायकवाड सर आणि त्यांच्या सौ.लता ताई गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सोबत श्री शंकर सोळसे साहेब उद्योजक यांचाही सत्कार करण्यात आला.

प्रसंगी मातंग समाज संघात सक्रिय सहभाग होणार असल्याचे नमूद केले आहे.

सन्माननीय सुभेदार यशवंत पवार सर यांचे खूप धन्यवाद आणि आभार


.