क्रोधाला ओळखणे व त्यातून बाहेर येणे
व्यसनापासून
लांब राहण्याच्या काळात आपल्याला वेगवेगळ्या परिस्थितीशी सामना करावा लागतो. अशा
परिस्थितीत आपण निराश किंवा क्रोधितही होतो. आपल्याला प्रत्येक गोष्टीत असेच वाटत
असते की आपल्याकडे दुसरा कोणताच मार्ग नाही. पण राग येण्यासाठी ही बंधने नसतात.
राग कोणावरही आणि कधी ही येतो. राग ही पूर्णतः सर्वसामान्य मनुष्याची भावना आहे.
पण जेव्हा हा राग आवाक्याबाहेर जातो त्यावेळेस समस्या तयार होतात. आपल्या वैयक्तिक
नातेसंबंधात तसेच आपल्या आयुष्याच्या पुढील मार्गक्रमणातही समस्या निर्माण होतात. ही गोष्ट आपल्याला विचलित करू शकते.
एकदा एका गावामधे एक मुलगा रहात होता. तो सतत क्रोधित अवस्थेतच असायचा. छोट्या छोट्या गोष्टीत उदास व्हायचा. कधी कधी तर इतरांशी खेकसूनही बोलायचा. त्याच्या वडलांनी एकदा त्याला खिळे आणि हातोडी दिली व सांगितले जेव्हा जेव्हा तुला राग येईल तेव्हा खिळा भिंतीला ठोकायचा. मुलाने प्रत्येकवेळी राग आल्यावर खिळा ठोकायला सुरवात केली. बराच वेळा खिळा ठोकताना त्याच्या हाताला ईजा होत असे. जेव्हा त्या मुलाने पाहिले की भिंतीवर खूप खिळे ठोकले गेले आहेत तेव्हा त्याच्या लक्षात आले की आपल्या रागाचे प्रमाण भरपुर आहे. यावर काही तरी उपाय करावा असेही त्याला वाटू लागले.
काही दिवसांनी तो वडलांकडे आला. वडील त्याला म्हणाले,"तू यातून काय शिकलास?". मुलगा वडलांना हात दाखवत म्हणाला, "मी विनाकारण रागाच्या भरात माझ्या हाताला ईजा करून घेतली याचा अर्थ रागामुळे आपले स्वतःचेच नुकसान होते. वडिलांनी त्याला भिंतीवरचे खिळे काढून आणायला सांगितले. मुलाने खिळे काढून आणल्यावर वडिलांनी भिंतीकडे बोट दाखवत विचारले," तुला काय दिसतय". त्यावर मुलगा म्हणाला," भिंतीवर खुप भोक पडली आहेत". लागलीच वडलांनी सांगितले की, "बघ आपल्या रागामुळे फक्त आपलेच नाही तर इतरांचेही नुकसान भरपूर होते. इतरांनाही ईजा होते. क्रोधाने नातेसंबंध संपूष्टात येतात, दोन व्यक्तींमधील विश्वास संपतो, चांगले विचार मरतात आणि आपण स्वतःही विचलित होतो.
ज्या व्यक्तींना क्रोधावर नियंत्रण ठेवता येत नाही असे लोक पुढे आपल्या जवळील नातेसंबधीतांनाही शिवीगाळ करु शकतात. रागावर नियंत्रण नसणा-या पालकांमुळे मुलांवरही परिणाम होतात. सतत क्रोधित राहणा-या व्यक्तींमुळे त्यांच्या सहवासातले इतर लोकही आक्रमक होऊ शकतात.
आपण क्रोधित झालो असल्याचे आपल्याला कधी जाणवते? जेव्हा आपण आरडा ओरडी करतो तेव्हा, जेव्हा आपण एखाद्याला मारहाण करत असतो तेव्हा, किंवा आपण वस्तुंची फेकाफेक किंवा मोडतोड करतो तेव्हा.
"मी संतप्त झालो आहे. मी तुझा तिरस्कार करतो. मला तू आवडत नाहीस... असे वाटते की तुझा सर्वनाश करावा?
जेव्हा आपण असे काही शब्द वापरतो तेव्हा खरतर आपल्यात खदखदत असलेला रागच बाहेर पडत असतो. ब-याचवेळा असही होत की आपल्याला एवढा भयंकर राग आलेला असतो की इतर कोणत्याही गोष्टीचे भान राहत नाही. आपल्या नकळत आपण आपला राग व्यक्त करण्यासाठी टोकाची भूमिका घेऊ लागतो. आपल्या उपचारानंतर आपण आपल्या व्यसनापासून दुर असतो. आपल्याला व्यसनामुळे ज्या कचेरीतून कमी करण्यात आले होते त्याठिकाणी आपण पुन्हा रुजू होण्यासाठी जातो. आपण आशा धरून ठेवतो की ते त्वरीत रुजू करून घेतील. पण तसे होत नाही. ते आपल्याला उद्या या, पुढच्या आठवड्यात भेटा असे सांगतात, आणि हे असे सुरुच राहते. एकदिवस ते आपल्याला कुत्सितपणे सांगतात की आम्ही आपणास ठेऊन घेऊ शकत नाही. आपली निराशा होते. कामावर घ्यायचे नव्हते तर मग मला इथून तिथे फे-या का मारायला लावल्या? हे आधी सांगू शकत नव्हते का? आपल्याला यागोष्टीचा त्रास होतो, आपले मन दुखविले जाते.
थोड्यावेळाने हे कळते की आपले मन दुखवल्यापेक्षाही रागाची तिव्रता जास्त झालेली आहे. तो राग इतरांवर व आपल्या स्वतःवरही येत राहतो.
आपण हे सर्वकाही आपल्या जवळच्या मित्रांजवळही बोलू शकतो,"मी इतका निराश झालो आहे की मला आत्महत्या करावीशी वाटते". जेव्हा तो मित्र विचारतो,"तु रागावला आहेस का?" आपले नेहमी हेच उत्तर असते की," नाही, मी फक्त उदास झालो आहे." त्यावेळेस खरतर आपणास सर्वकाही हातून निसटल्यासारखे, सर्व आशा संपुष्टात आल्या सारखे वाटत असते. भविष्यातही ही परिस्थिती बदलेल अशी चिन्ह आपणास दिसत नाही. अशावेळेस आपण जर आपल्या आत झाकून पाहिले तर दिसून येते की आपण स्वतःवरच जास्त नाराज झालेलो आहोत.
शांत राहून नाराजी व्यक्त करणे हाही एक रागाचाच प्रकार आहे. यात आपण निष्क्रिय व शांत रहातो. आपल्याला जरी एखाद्या व्यक्तीवर नाराजी किंवा राग व्यक्त करायचा असेल तरी आपले तोंड उघडत नाही किंवा आपल्याला तशी हलचालही करता येत नाही.
रामु म्हणतो," जेव्हा माझी पत्नी ओरडते, मी गप्प रहातो. मी माझ्या समोरासमोर व्यक्त होणा-या रागावर नियंत्रण ठेवायला शिकलो आहे. पण आतमध्ये माझ्यातला असंतोष खदखदत असतो. मी मान्य करतच नाही की मला राग आलेला आहे. मी राग न आल्याचा अभिनय करु लागतो".
जेव्हा रामु तो राग गिळत असतो त्याचा राग संपुष्टात येते नाही. तो सुप्त ज्वालामुखी सारखा बनत जातो. कधी ना कधी त्याचा उद्रेक हा होणारच असतो. असा राग गिळणे म्हणजे ऍसिडने स्वाभिमानावर केलेला शिडकावाच असतो अशावेळेस आपणास व्यसन हाच एकमेव मार्ग असल्याचे जाणवू लागते.
विक्षिप्तपणे किंवा कुत्सितपणे व्यक्त
केलेल्या भावनाही रागाच्याच असू शकतात.
एकदा मी घरी आलो तेव्हा पाहिले की माझ्या पत्नीने रात्रीच्या जेवणासाठी दही-भाताशिवाय काहीच बनवलेले नाही. जेव्हा तिने जेवण वाढले तेव्हा मी हसलो आणि म्हणालो, "रात्रीच्या जेवणासाठी काय झक्कास जेवण तयार केल आहेस मला आधी माहित असते तर माझ्या काही मित्रांनाही जेवणाला बोलावले असते नाही का".
आपली ही अजून एक खूप मोठी समस्या असते. अशी प्रतिक्रिया राग या प्रकारातली दिसत नाही पण ती रागाचीच असते. याचे कारण आपण स्वतःला दुर्दैवी, कमनशिबी मानत असतो. आपले कुटुंबिय, आपले मित्र, आपले सहकारी आणि संपूर्ण जगच आपल्या जे पाहिजे आहे, जसे पाहिजे आहे, ज्याची आपल्याला गरज आहे व आपली जी इच्छा आहे ते देऊ शकत नाहीत असे वाटत असते. कधी कधी तर आपल्या मागण्या, इच्छा योग्य आहेत किंवा नाही याचा विचारही करत नाही आणि त्यापूर्ण न झाल्यामुळे राग मात्र येतच असतो. आपले आयुष्य इतरांप्रमाणे नाही याची वारंवार खंत वाटत असते. आपण या जगातील क्रुर व्यक्तींच्या कटात फसलेलो आहोत असे वाटत असते. तसेच आपला नशिबावर फारच भरोसा असतो किंवा दोष द्यायला एक चांगले कारण मिळालेले असते. फक्त कमनशिबीपणा माझ्या वाट्याला आणि चांगले नशिब फक्त इतरांच्या वाट्याला आले असल्याचे वाटत असते.
एकदा मी घरी आलो तेव्हा पाहिले की माझ्या पत्नीने रात्रीच्या जेवणासाठी दही-भाताशिवाय काहीच बनवलेले नाही. जेव्हा तिने जेवण वाढले तेव्हा मी हसलो आणि म्हणालो, "रात्रीच्या जेवणासाठी काय झक्कास जेवण तयार केल आहेस मला आधी माहित असते तर माझ्या काही मित्रांनाही जेवणाला बोलावले असते नाही का".
आपली ही अजून एक खूप मोठी समस्या असते. अशी प्रतिक्रिया राग या प्रकारातली दिसत नाही पण ती रागाचीच असते. याचे कारण आपण स्वतःला दुर्दैवी, कमनशिबी मानत असतो. आपले कुटुंबिय, आपले मित्र, आपले सहकारी आणि संपूर्ण जगच आपल्या जे पाहिजे आहे, जसे पाहिजे आहे, ज्याची आपल्याला गरज आहे व आपली जी इच्छा आहे ते देऊ शकत नाहीत असे वाटत असते. कधी कधी तर आपल्या मागण्या, इच्छा योग्य आहेत किंवा नाही याचा विचारही करत नाही आणि त्यापूर्ण न झाल्यामुळे राग मात्र येतच असतो. आपले आयुष्य इतरांप्रमाणे नाही याची वारंवार खंत वाटत असते. आपण या जगातील क्रुर व्यक्तींच्या कटात फसलेलो आहोत असे वाटत असते. तसेच आपला नशिबावर फारच भरोसा असतो किंवा दोष द्यायला एक चांगले कारण मिळालेले असते. फक्त कमनशिबीपणा माझ्या वाट्याला आणि चांगले नशिब फक्त इतरांच्या वाट्याला आले असल्याचे वाटत असते.
महत्वपुर्ण
अवस्था
·
दारु पिण्याच्या
क्षमतेत वाढ
·
लपवुन पिणे
·
दारु पिण्यास
प्रथम प्राधान्य देणे.
·
समस्या मांडण्यास
असमर्थ
·
निरनिराळे बहाणे
करुन दारु पिणे
·
वारंवार पश्चाताप
करणे
·
वचन आणि संकल्प
अयशस्वी ठरणे
·
कोणत्याही गोष्टीत
रस नसणे
·
कामात आणि आर्थिक
समस्या
·
खाण्यापिण्याकडे
दुर्लक्ष करणे.
·
प्रासंगीक दारु
पिणे.
·
सातत्याने दारु
पिणे
·
दारु सोडण्याच्या
प्रयत्नात वारंवार असफलता येणे.
·
अपराधीपणाची भावना
·
स्मरणशक्ती वर
परीणाम होणे.
व्यसन हा एक आजार आहे. तो
शारीरीक, मानसिक, कौंटुंबिक आणि सामाजिक स्वरूपाचा आजार आहे. तो गुंतागुंतीचा
आजार आहे. हा जन्मभराचा आजार आहे. पण त्यावर नियंत्रण ठेवता येते. परत परत उद्भवणारा
हा आजार असला तरी त्याची मानसिक ओढ कमी करण्याचा, त्या ओढीवर मात करण्याचा
प्रयत्न आपण करू शकतो. ती ओढ का व कशी निर्माण होते हे समजल्यास अशी मात करता
येते आणि माणूस वर्षानुवर्ष व्यसनापासून दूर राहू शकतो.
मादक द्रव्याचं सेवन करण्यामागे एकच एक कारण आहे असं म्हणता येणार नाही. एखादी व्यक्ती अशा प्रकारचं सेवन करण्यामागे निरनिराळी कारणं असू शकतात.
मादक द्रव्याचं सेवन करण्यामागे एकच एक कारण आहे असं म्हणता येणार नाही. एखादी व्यक्ती अशा प्रकारचं सेवन करण्यामागे निरनिराळी कारणं असू शकतात.
तरूण मुलं
मादक द्रव्याचं सेवन का करतात?
·
प्रयोग करून बघण्याची इच्छा व उत्सुकता
·
कंटाळा
·
मित्रांचा दबाब
·
वैफल्य व औदासिन्य
·
पालकांकडून येणारा दबाव
·
शैक्षणिक दबाव
·
माझा मुलगा जर
नशील्या पदार्थांचे सेवन करतांना पकडला गेला तर त्याला कायद्याने काही शिक्षा होते
का?
हो एनडीपिएस एक्ट नुसार नशीले पदार्थ वाप्ररणे गुन्हा आहे, ते तुम्ही तुमच्या करता वापरा किंवा दुस-या कामाकरता करता वापरा. आणि दंड हा ड्रग्स किती प्रमाणात वापरतो याच्या वर अवलंबुन असते. जर एखाद्याला ड्रग्स बाळगण्यासाठी किंवा सेवन केल्यामुळे शिक्षा झाली असेल आणि त्याची सुधारायची इच्छा असेल तर तो एखाद्या डी-ऍडिक्शन सेंटर मध्ये उपचार घेऊ शकतो आणि त्याने ऊपचार मध्येच थांबवले आणि परत व्यसनाकडे वळाला तर त्याला परत शिक्षा होऊ शकते.
हो एनडीपिएस एक्ट नुसार नशीले पदार्थ वाप्ररणे गुन्हा आहे, ते तुम्ही तुमच्या करता वापरा किंवा दुस-या कामाकरता करता वापरा. आणि दंड हा ड्रग्स किती प्रमाणात वापरतो याच्या वर अवलंबुन असते. जर एखाद्याला ड्रग्स बाळगण्यासाठी किंवा सेवन केल्यामुळे शिक्षा झाली असेल आणि त्याची सुधारायची इच्छा असेल तर तो एखाद्या डी-ऍडिक्शन सेंटर मध्ये उपचार घेऊ शकतो आणि त्याने ऊपचार मध्येच थांबवले आणि परत व्यसनाकडे वळाला तर त्याला परत शिक्षा होऊ शकते.
·
जर कोणी एखादा
पार्टिमध्ये स्वत: ड्रग्स घेत असेल आणि स्वत:च्या मित्रांनाही ड्रग्स पुरवताना
पकडला गेला तर?
तर होणारी शिक्षा हि ड्रग्स किती प्रमाणात सापडते याच्या वर अवलंबुन असते. ड्रग्सचे प्रमाण आणि होणारी शिक्षा याचे प्रमाण खाली तक्त्यात दिले आहे
तर होणारी शिक्षा हि ड्रग्स किती प्रमाणात सापडते याच्या वर अवलंबुन असते. ड्रग्सचे प्रमाण आणि होणारी शिक्षा याचे प्रमाण खाली तक्त्यात दिले आहे
१. कमी प्रमाण
|
६ महिने शिक्षा किंवा १०००० रु दंड किंवा
दोन्हीही
|
२. मध्यम प्रमाण
|
१० वर्षापर्यंत शिक्षा किंवा १,००,००० रु दंड किंवा दोन्हीही
|
३. जास्त प्रमाण
|
१० ते २० वर्षापर्यंत शिक्षा किंवा १,००,००० ते २,००,००० रु दंड
|
कायद्यानुसार आमली पदार्थांचे प्रकार आणि प्रमाण खालील तक्त्यात नमुद केले आहे.
ड्रग
|
कमीप्रमाण
|
जास्तप्रमाण
|
हेरोइन
|
५ ग्रॅम
|
२५० ग्रॅम
|
कोकेन
|
२ ग्रॅम
|
१०० ग्रॅम
|
चरस
|
१०० ग्रॅम
|
१ कि.ग्रॅम
|
ओपीयम
|
२५ ग्रॅम
|
२.५ कि.ग्रॅम
|
गांजा
|
१ ग्रॅम
|
२० कि.ग्रॅम
|
जर एखादा कमी वयाचा असेल तर त्याला काही सवलत मिळते
का?
हो जर १८ पेक्षा कमी वय असेल त्याला एक विशेष कायदा असतो काळजी व रक्षण व या कायदयानुसार त्याला
सुधार केंद्रात ठेवले जाते.
जर मला एखाद्या ड्रग विक्रेत्याबद्दल माहिती मिळाली तर
मी कोणाकडे तक्रार करु?तुमच्या नजीकच्या पोलिस स्टेशन मध्ये तुम्ही तक्रार नोंदवू शकता, किंवा स्थानीय अधिकारी, नारकोटीक्स नियंत्रण
ब्युरो व ज्यांना कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार आहेत अशांकडे तक्रार
नोंदवु शकता.
अशी काही कायदेशीर तरतुद आहे का कि काही ठराविक
प्रमाणात ड्रग्स आपण बाळगु शकतो?नाही, ड्रग्सचा वापर करणे कायदेशीर नाही, भले ही ते कितीही कमी प्रमाणात असेल. तरी देखील काही असे ड्रग्स
आहेत की जे आपण जर
डॉक्टरांच्या सल्याने घेऊ शकता, जसे
प्रॉक्सीव्हॉन, ब्रुफेन.
खाली दिलेल्या परिस्थीतीमध्ये कोण अपराधी किंवा
कारणीभुत ठरु शकतो?जर माझा मित्र माझ्या जागेत ड्रग्सचा वापर करत असेल तर
जर तो तुमच्या परवानगीने करत असेल तर किंवा तुम्हाला याची कल्पना असेल तर अशावेळी तुम्ही दोषी ठरता.
आणि जर तो हे तुमच्या नकळत करत
असेल तर मात्र ते दोषी असतात.
जय लहुजी ------
No comments:
Post a Comment